अवेळी पडणारा पाऊस, कमी पुरवठा देणारे नदी व तलाव, बांध आणि कॅनाल यांची कमतरता आणि अयोग्य वापर यामुळे शेतकरी हा पाण्यासाठी पूर्णपणे बोअरवेल वर अवलंबून आहे. त्यात कमी पाणी देणारे, काही अगदी बंद व कोरडे असलेले बोअरवेल त्यामुळे विशेषतः उन्ह्याळ्यात शेतकऱ्यांसमोर पाण्याची भीषण समस्या उद्भवते. हीच समस्या ओळखून खनिज अभियंता श्री. विशाल बगले हे गेल्या २० वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात बोअरवेल ला पाणी वाढविण्यासाठी ‘जलसंजीवन’ केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट करतात. ही एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया -केमिकल ट्रीटमेंट आहे. त्यांचे वडील स्वतः ड्रिलिंग अभियंता व भूगर्भ शास्त्रज्ञ श्री. अशोक बगले यांनी सुरुवात केलेल्या या प्रयोगावर बऱ्याच वर्षांपासून निरंतर संशोधन करून आता श्री. विशाल बगले यांनी अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत होणारे, सोयीस्कर आणि उत्तम निकाल देणारे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. संपूर्ण भारतात अशा प्रकारचे आणि या दर्जाचे काम कोणीच करत नाही.
